हे अगदी मोजकेच फोटो आहेत. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा या भागात आत्तापर्यंत १९ वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन केले गेले आहे. आणि या १९ मधील ११ प्रजाती सह्याद्रीतील प्रदेशनिष्ट अशा आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीतील अत्यंत महत्वाच्या या घटकाकडे खरेतर तर आपण कुतुहलाने कधीच पाहत नाही. याला पाहुन बरेच जण किळस करतात. खरेतर बेडुक सर्प यांच्या इतके स्वच्छ प्राणी जगात दुसरे कोणतेही नसतात. यांना त्यांच्या अंगावर धुळीचा एक ही कण आवडत नाही. आपल्याकडील बेडकांच्या विश्वात संशोधनासाठी खुप वाव आहे. बेडकांविषयी जनजागरण देखील खुप महत्वाचे आहे. यांचे संवर्धन होणे तितकेच महत्वाचे आहे.
याचा अंदाज गणितीय पध्दतीने बांधला आणि त्यातुन एक अफाट माहिती समोर आली ते म्हणजे राजगड बांधकामासाठी कित्येक लक्ष टन दगड वापरला गेला. इतके दगड खुद्द् किल्ल्यावर नव्हतेच, शक्यच नाही, मग आले कुठून, आणले कुणी, आणले कसे असे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
सह्याद्रीतील अनमोल रत्ने म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन शिवकाळात व त्याही पुर्वी राज्य रक्षण व संवर्धनासाठी बांधलेले किल्ले. आपले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राची गडलक्ष्मी.