बाहेर आल्यावर त्यांना आकाशात शहराच्या वर, अगदी माथ्यावर एक मोठा ढग दिसला. त्यात विविध रंग होते. काहीजणांना तो ढग एखादे परग्रह वासीयांचे यान आहे अस वाटुन शेकडो लोकांनी हेल्प लाईन ला फोन करुन पृथ्वीवर परग्रहवासीयांनी आक्रमण केले असल्याचे सांगितले व तात्काळ मदत मागितली. असे शेकडो फोन/तक्रारी आल्याने परग्रहांचा अभ्यास करणा-या मंडळींशी संपर्क साधला गेला.
वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता.