वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता.
प्राचीन भारतीय साहित्य किंवा आख्यायिका, दंतकथांमध्ये या सर्प व सर्पधराची कथा न येण्याचे कारण असे असेल की भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी कल्पिलेल्या २७ (वेदकाळात २८) नक्षत्रांच्या पट्ट्यात हा तारकापुंज येत नाही. अत्यंत प्रगत असणा-या भारतीय खगोल शास्त्रामध्ये पृथ्वी, सुर्य व इतर ग्रहांच्या अभ्यासाने कालनिश्चय करुन कालगणनेची सुत्र मांडली. कदाचित हजारो वर्षांपुर्वी बनवलेली ही सुत्रे आज ही तितकीच उपयोगाची आहेत. त्यामुळे निव्वळ कथा कल्पना विस्तार की ज्याचा खगोलशास्त्राशी काही संबंध नाही अशा गोष्टी भारतीय खगोल शास्त्रामध्ये खुप कमी प्रमाणात आढळतात.