0

काजवे म्हणजे काय? ते चमकतात कसे? त्याचे जीवनचक्र कसे असते? काजवे खातात काय?

पुण्याच्या अगदी चारही दिशांना , जिथे जंगल आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला काजवे पाहता येतील. काजवे पाहण्यासाठी तुमची अंधारात तास दोन तास चालण्याची तयारी असायला हवी. अगदी जवळच्या जवळ जायचे असेल तर मुळशी गाठा. मुळशीतील अंधारबन, गोठे गावाच्या मागील जंगल, भांबर्डे गाव, घनगड किल्ला जंगल परीसर इ ठिकाणी काजवे नक्की आढळतात.
Continue reading
0

संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव

वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता.
Continue reading
महाराष्ट्रातील रानभाज्या
0

मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती

वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपणास रानावनांत खावयास मिळतात. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवींच्या या भाज्या ओळखता मात्र आल्या पाहिजे. यातील अनेक वनस्पती औषधी आहेत. स्थानिक परंपरागत ज्ञानाप्रमाणे विविध वनस्पतींचा उपयोग विविध विकारांवर जखमांवर केला जातो. उदा कोळ्याचा मका नावाचा एक कंद पावसाळ्यात फुलतो. अगदी मक्यासारखाचा पण बहारदार दिसणा-या या मक्याचा कंद विंचवाचे विष उतरवण्यासाठी वापरतात.. आपल्या भागातील विविध रानभाज्यांविषयीचे संकलन या लेखामध्ये आहे. लिंक वर क्लिक करुन भाजीची, ओळख, पाककृती, औषधी उपयोग अशी माहिती मिळवा.
Continue reading
0

पावसाळ्यातील आणखी एक रानमेवा

यावेळी वाटीमध्ये रस्सा नव्हता. घेवड्याच्या आकाराचे काहीतरी, वाटीभरुन, सुके, मसाल्यामध्ये मस्त वाफलुन घेतलेले. मी आधी चमच्याने दाबुन पाहिले तर तो जिन्नस अगदी व्यवस्थित शिजलेला आहे की नाही हे तपासुन पाहिले. जाणीवपुर्वक , मी खाणार असलेला पदार्थ काय आहे हे न विचारताच मी एक चमचा भरुन घेतला, व अलगद घास घेतला
Continue reading
0

पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे

मागच्या काही दिवसात मी सलग १५ दिवस कॅम्पसाईट व वेल्ह्याच्या मावळ पट्ट्यात कामानिमित्त मुक्कामी होतो. कॅम्पसाईट...
Continue reading
0

गडलक्ष्मी – महाराष्ट्राचे गडवैभव

याचा अंदाज गणितीय पध्दतीने बांधला आणि त्यातुन एक अफाट माहिती समोर आली ते म्हणजे राजगड बांधकामासाठी कित्येक लक्ष टन दगड वापरला गेला. इतके दगड खुद्द् किल्ल्यावर नव्हतेच, शक्यच नाही, मग आले कुठून, आणले कुणी, आणले कसे असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. सह्याद्रीतील अनमोल रत्ने म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन शिवकाळात व त्याही पुर्वी राज्य रक्षण व संवर्धनासाठी बांधलेले किल्ले. आपले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राची गडलक्ष्मी.
Continue reading