0

पिंड ते ब्रह्मांंड

मनुष्य म्हणुन आपले स्वतःचे जे अस्तित्व आहे, जाणिव आहे, चैतन्य बनलेले आहे की ज्यास आपण ‘मी’ म्हणतो त्या ‘मी’ ला शरीरातील इतक्या अतीसुक्ष्म क्रिया-प्रक्रियांची पुसटशी देखील कल्पना नसते. शरीरामध्ये अहोरात्र प्रत्येक पेशी आपापले काम करीत आहे, स्वतंत्र पणे करीत आहे. तरीही पिंडातील या सा-या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या पेशीपेशींमध्ये कमालीचे सामंजस्य आहे, तारतम्य आहे.
Continue reading
0

भग्न कैलासगड व माझी कारवीशैय्या

चांगल्या दोन तीन डझनभर ताज्या काठ्या आणि त्याला अजुनही न सुकलेली भरदार गच्च हिरवी पाने होती. मी त्वरीत उठलो, सर्व कारवी जमा केली आणि एकावर एक रचली व पाचेक मिनिटांनी माझा कारवीचा बेड तयार झाला. अगदी तॄणशैय्या जरी नसली तरी हलता झुलता हवेशीर वेडावाकडा असा माझा तो बेड सज्ज होता. माझा हा सर्व पराक्रम सुरु असताना सोबतची मंडळी मात्र मला वेड्यात काढण्यात कसलीही कसर सोडत नव्हते. मी मात्र
Continue reading
0

निसर्गशिबिर का गरजेचे आहे?

मुलांचे बालपण हिरावुन घेऊ पाहणा-या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग खरतर खुपच कमी आहे निखळ आनंदासाठी.   डोळ्यांचे विकार, गेम खेळण्याचा सवय, सोशल मीडीयावर सतत लक्ष अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुलांना हळुह्ळु मानसिक व शारिरीक दृष्ट्या जड बनवितात. मोबाइल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानातील खेळ खेळण्यात अधिक आनंद आहे याची प्रचीती अशा शिबिरांमधुन होत असते. 
Continue reading
0

भारतातील बांबु – काल, आज आणि…

या धनुष्यांची उंची कमीत कमी पाच फुट ते अधिकाधिक ८ फुट होती. याला बाण लावुन प्रत्यंचा खेचण्यासाठी धनुष्याचे एक टोक चक्क जमिनीवर ठेवुन, डाव्या पायाने दाबुन धरावे लागत असे. डावा पाय लावला नाही तर धनुष्याला स्थैर्य मिळत नसे. मग साधारण तीन ते चार फुट लांबीचा, मनगट भर जाडीचा बाण , तोही बांबुचाच धनुष्यावर चढवुन शत्रुवर सोडला जायचा. हा बाण इतका भेदक होता की....
Continue reading
6

निसर्गशाळा – मागे वळुन पाहताना

आणि निसर्गशाळेची ही दुसरी सहल ठरली. त्यावेळी निसर्गशाळेत माळरानाशिवाय अन्य काहीच नव्हते. पावसाळ्यातच केवळ सुंदर, विलोभनीय दिसणारी निसर्गशाळा उन्हाळ्यात हकास व्हायची. झाडे नव्हती, हिरवे छत्र अजिबात नव्हते. एकही साधे पत्र्याचे छप्पर देखील नव्हते. टॉईलेट नव्हते..
Continue reading
0

शाळेसोबतच निसर्गात रमणारा निसर्गशिक्षक मिलिंद गिरधारी

तर कुणीही सह्याद्रीतील अगदी कोणत्याही झाडा-झुडपाची माहिती विचारली तरी ही व्यक्ति माहिती द्यायचीच द्यायची. सतत सतत कमेंट मध्ये त्यांचे नाव दिसु लागले. हळु हळु हे नाव इतके परिचयाचे झाल्यासारखे झाले की जोपर्यंत त्यांचे उत्तर येत नाही तो पर्यंत नाव निश्चिती मी करीत नसे. यांनी सांगितले म्हणजे १००% सत्य व अचुकच अशी माझी खात्री झाली. त्यांचे नाव म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.
Continue reading
0

रंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंग कसे बनवावेत?

हा झाला एक (तत्वज्ञान व दर्शन) भाग तर दुसरा महत्वाचा भाग ऋतुमानाशी मिळते जुळते घेण्याचा संदेश देण्याचा आहे. उन्हाळा सुरु होत बदलतल्या तापमानाशी जुळते घेण्यासाठी रंग खेळण्याची प्रथा पुर्वापार सुरु आहे. होळी पोर्णिमे पासुन सुरु होणारा या सणाचा समारोप रंगपंचमीला होतो.
Continue reading
0

साहसाचे वेड की वेडे साहस?

हा तानाजी कडा खरंच कां हो इतका जीवघेणा, अवघड आहे ?काय झाले असेल नेमके अपघाताचे कारण ?" कारण,आणि खरंच असल्या प्राणघातकी छंदास, खेळ कसे समजावे आम्ही?" आणखीही बरंच काही विचारत होते तात्या. पुंडलीक सरांच्या त्या कातर झालेल्या स्नेह्यास, म्हणजे तात्यांना मी काहीबाही उत्तरे देत गेलो. पण,यापेक्षा देखील वरचढ मूर्खपणा मी काही दिवसापूर्वीच त्याच कड्यावर केला होता, हे सांगण्याचे धाडस मात्र मला झाले नाही.
Continue reading
0

आडवाटेने जाऊन अंतरिक्षाचा ठाव घेणारा अवलिया

नोकरी सोडुन गावी आल्यावर, आडवाटेने वस्तीपासुन थोडे दुर शेतात जाऊन पती-पत्नी असे दोघांनी निसर्गातील संसाधनांचाच वापर करुन एक झोपडी बनविली. वडिलोपार्जित शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या झोपडी गाव-वस्तीपासुन खुपच दुर आहे.
Continue reading
0

आकाशातील चित्तरकथा ब्रह्महृद्याची

सुर्यसिद्धांत या खगोलीय ग्रंथामध्ये ब्रह्महृद्याबाबतील खालील श्लोक येतो. हुतभुग्ब्रह्महृद्यौ वृषे द्वाविंंशभागगौ ॥ अष्टाभिः त्रिंशता चैव विक्षिप्तावुत्तरेण तौ । सुर्य सिध्दांत हे पुस्तक १२००० वर्षांपुर्वी लिहिलेले आहे. ब्रह्महृद्य या ता-याची चित्तरकथा वाचण्यासाठी लिंक करा..
Continue reading