एक दोन दिवसांपासुन समाधानकारक पाऊस सुरु झालेला दिसतोय पुणे परिसरामध्ये. आपल्या कॅम्पसाईट परिसरामध्ये तर या आधीच मस्त पाऊस सुरु झालाय. ओढे, नद्या, नाले खळखळ वाहु लागले आहेत. आणि असेच मोहीत करणारे, हिरवे हिरवेगार गालिचे पुणे परिसरामध्ये लवकरच दिसतील. आपल्या सर्वांनाच ज्या पावसाची प्रतिक्षा होती तो झालाच सुरु एकदाचा.
पण पाऊस कधी सुरु होईल, होईल की नाही होईल यावर्षी पाऊस, पुरेसा पाऊस पडेल की नाही अशा अनेक चिंतांनी आपण सारेच ग्रासलेलो होतो. इतके की सोशल मीडीयावर पाऊसाचे तुलना वाट पहायला लावणा-या प्रियसी सोबत केल्याचे मेमेज अगदी भरभरुन व्हायरल झाले.
पाऊस कुणाला नकोय बरे? सर्वांनाच पाऊस हवाय. पण तो पाऊस योग्य पध्दतीने पडण्यासाठी आपणाकडे जसे पर्यावरण हवे, जसे पुर्वी होते तसे आता राहिले नाही. काही मोजकेच पर्यावरण प्रेमी लोक नाना प्रकारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करताहेत. अशा लोकांसाठी पाऊस म्हणजे संजीवनीच आहे. व हौशे-नवशे-गवशे देखील पावसाची वाट पाहतातच की. एकदाका पाऊस सुरु झाला की मग यांना घाटामाथ्यावर म्हणजे मुळशी, मावळ, वेल्हा, भोर अशा मावळ भागात जाऊन मद्यधुंद व्हायचे असते. धांगडधिंगाणा करायचा असतो. तर काहींना नुकत्याच हिरव्यागार झालेल्या एखाद्या डोंगरासोबत सेल्फी काढायचा असतो. असणारच असे लोक देखील. पण यांना पावसाच्या येण्याशी किंवा न येण्याशी फार काही देणे घेणे नसते. असो
तर ज्या लोकांना मुळातच निसर्गाची आवड आहे, निसर्गात रमायला ज्यांना आवडते, जे निसर्गात आपोआपच रममाण होतात, मंत्रमुग्ध होतात अशा लोकांना पाऊस कधी सुरु होईल, सुरु झाला तर खुप जास्त होईल की, मध्यम होईल की खुप कमी पाऊस होईल की दुष्काळच पडेल अशा प्रश्नांची उत्तरे आधीच मिळाली तर?
तुम्ही म्हणाल की यासाठी हवामान खाते आहे की, त्यांचा अंदाज वाचला की कळेल आपणास सर्व! पण हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबुन राहणे म्हणजे पुर्वतयारी साठी वेळ न मिळण्यासारखे आहे. हवामान खात्यास देखील पावसाचे पुर्वानुमान अचुक सांगणे अद्याप जमले नाही. मग कसे काय कळणार बरे पावसाचा अंदाज?
यासाठी या व्हिडीयोमध्ये, मारुती चितमपल्ली यांचे निसर्गाचे हवामान खाते अवश्य पहा. अंदाजे १५ मिनिटांचा व्हिडीयो आहे, त्यामुळे एकाच बैठकीत पाहता येईल अशी वेळ निवडुन आठवणीने पहा ऐका मारुती चितमपल्ली यांना!
चांगल्या दोन तीन डझनभर ताज्या काठ्या आणि त्याला अजुनही न सुकलेली भरदार गच्च हिरवी पाने होती. मी त्वरीत उठलो, सर्व कारवी जमा केली आणि एकावर एक रचली व पाचेक मिनिटांनी माझा कारवीचा बेड तयार झाला. अगदी तॄणशैय्या जरी नसली तरी हलता झुलता हवेशीर वेडावाकडा असा माझा तो बेड सज्ज होता. माझा हा सर्व पराक्रम सुरु असताना सोबतची मंडळी मात्र मला वेड्यात काढण्यात कसलीही कसर सोडत नव्हते. मी मात्र
मुलांचे बालपण हिरावुन घेऊ पाहणा-या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग खरतर खुपच कमी आहे निखळ आनंदासाठी. डोळ्यांचे विकार, गेम खेळण्याचा सवय, सोशल मीडीयावर सतत लक्ष अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुलांना हळुह्ळु मानसिक व शारिरीक दृष्ट्या जड बनवितात. मोबाइल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानातील खेळ खेळण्यात अधिक आनंद आहे याची प्रचीती अशा शिबिरांमधुन होत असते.
या धनुष्यांची उंची कमीत कमी पाच फुट ते अधिकाधिक ८ फुट होती. याला बाण लावुन प्रत्यंचा खेचण्यासाठी धनुष्याचे एक टोक चक्क जमिनीवर ठेवुन, डाव्या पायाने दाबुन धरावे लागत असे. डावा पाय लावला नाही तर धनुष्याला स्थैर्य मिळत नसे. मग साधारण तीन ते चार फुट लांबीचा, मनगट भर जाडीचा बाण , तोही बांबुचाच धनुष्यावर चढवुन शत्रुवर सोडला जायचा. हा बाण इतका भेदक होता की....
आणि निसर्गशाळेची ही दुसरी सहल ठरली. त्यावेळी निसर्गशाळेत माळरानाशिवाय अन्य काहीच नव्हते. पावसाळ्यातच केवळ सुंदर, विलोभनीय दिसणारी निसर्गशाळा उन्हाळ्यात हकास व्हायची. झाडे नव्हती, हिरवे छत्र अजिबात नव्हते. एकही साधे पत्र्याचे छप्पर देखील नव्हते. टॉईलेट नव्हते..
तर कुणीही सह्याद्रीतील अगदी कोणत्याही झाडा-झुडपाची माहिती विचारली तरी ही व्यक्ति माहिती द्यायचीच द्यायची. सतत सतत कमेंट मध्ये त्यांचे नाव दिसु लागले. हळु हळु हे नाव इतके परिचयाचे झाल्यासारखे झाले की जोपर्यंत त्यांचे उत्तर येत नाही तो पर्यंत नाव निश्चिती मी करीत नसे. यांनी सांगितले म्हणजे १००% सत्य व अचुकच अशी माझी खात्री झाली. त्यांचे नाव म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.
हा तानाजी कडा खरंच कां हो इतका जीवघेणा, अवघड आहे ?काय झाले असेल नेमके अपघाताचे कारण ?" कारण,आणि खरंच असल्या प्राणघातकी छंदास, खेळ कसे समजावे आम्ही?"
आणखीही बरंच काही विचारत होते तात्या.
पुंडलीक सरांच्या त्या कातर झालेल्या स्नेह्यास, म्हणजे तात्यांना मी काहीबाही उत्तरे देत गेलो. पण,यापेक्षा देखील वरचढ मूर्खपणा मी काही दिवसापूर्वीच त्याच कड्यावर केला होता, हे सांगण्याचे धाडस मात्र मला झाले नाही.
आज प्रत्येकाला गोपाळ होता नाही येणार, २४ तास निसर्गाच्या सान्निध्यात नाही घालवता येणार. पण आपल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी देखील वसुंधरेच्या व मानवजातीच्या हितासाठी खुप महत्वाच्या व परिणामकरक सिध्द होऊ शकतात.
क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे?
की कुणी या कातळकड्यांच्या उसळणा-या लाटा तासुन बनविल्या असतील बरे? असे कोण आहे की ज्याने या कातळ सदृश्य पुराण-पुरुषांचा माथा कोरुन त्यांचे शिरपेच बनविले आहे? असे कोण आहे की ज्याने या खोल, रुंदच रुंद, अंतहीन कपारी, कंदरे, गुहा खोदल्या असतील? ह्म्म्.. दगडांच्या लाटा निर्माण करणा-या महान वादळाचा कर्ता मी आहे, होय मीच आहे!
वा…छान च