पर्यावरण पुरक शहरी जीवन जगणारी शीतल तळेकर
पर्यावरण पुरक वस्तु की जीवन? इकोफ्रेंडली हा शब्द आजकाल परवलीचा शब्द झाला आहे म्हणजे आजकाल आपण पाहतोय कित्येक उत्पादीत वस्तुंना, […]
पर्यावरण पुरक वस्तु की जीवन? इकोफ्रेंडली हा शब्द आजकाल परवलीचा शब्द झाला आहे म्हणजे आजकाल आपण पाहतोय कित्येक उत्पादीत वस्तुंना, […]
मुंग्यांचे अगदी सुक्ष्म निरीक्षण करुन, त्यांच्या स्वभावाचे निरीक्षण करुन मनुष्याने मुंग्यांचा उपयोग स्वतःसाठी करण्याची कला अगदी प्राचीन काळापासुन वापरली आहे. सुश्रूत या प्राचीन भारतीय महर्षींने सर्वप्रथम मुंग्यांचा असा वापर कसा केला जाऊ शकतो याविषयी सुश्रूत संहितेमध्ये लिहिले आहे.
एखाद्या वसाहतीमधील सर्वच्या सर्व मुंग्यांना मिळुन , हल्लीचे निसर्गाभ्यासक एक इंग्रजी शब्द वापरतात, तो म्हणजे ‘सुपर ऑरगॅनिझम’. सा-याच्या सा-या मुंग्या मिळुन ‘एक’ समष्टी जीवन तयार झालेले असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे वेगळे अस्तित्व असुन देखील तो तो प्रत्येक अवयव शरीराशी एकाकार झालेला असतो अगदी त्याचप्रमाणे या ‘सुपर ऑरगॅनिझम’ मधील प्रत्येक मुंगी ‘सुपर ऑरगॅनिझम’ शी एकाकार झालेली असते. प्रत्येक मुंगीसाठी तिचे स्वतःचे अस्तित्व टिकवणे ही दुय्यम ध्येय असते तर समुहाचे , समष्टीचे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने खटाटोप करणे हेच तिचे परम कर्तव्य असते
या धनुष्यांची उंची कमीत कमी पाच फुट ते अधिकाधिक ८ फुट होती. याला बाण लावुन प्रत्यंचा खेचण्यासाठी धनुष्याचे एक टोक चक्क जमिनीवर ठेवुन, डाव्या पायाने दाबुन धरावे लागत असे. डावा पाय लावला नाही तर धनुष्याला स्थैर्य मिळत नसे. मग साधारण तीन ते चार फुट लांबीचा, मनगट भर जाडीचा बाण , तोही बांबुचाच धनुष्यावर चढवुन शत्रुवर सोडला जायचा. हा बाण इतका भेदक होता की….
तर कुणीही सह्याद्रीतील अगदी कोणत्याही झाडा-झुडपाची माहिती विचारली तरी ही व्यक्ति माहिती द्यायचीच द्यायची. सतत सतत कमेंट मध्ये त्यांचे नाव दिसु लागले. हळु हळु हे नाव इतके परिचयाचे झाल्यासारखे झाले की जोपर्यंत त्यांचे उत्तर येत नाही तो पर्यंत नाव निश्चिती मी करीत नसे. यांनी सांगितले म्हणजे १००% सत्य व अचुकच अशी माझी खात्री झाली. त्यांचे नाव म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.
नोकरी सोडुन गावी आल्यावर, आडवाटेने वस्तीपासुन थोडे दुर शेतात जाऊन पती-पत्नी असे दोघांनी निसर्गातील संसाधनांचाच वापर करुन एक झोपडी बनविली. वडिलोपार्जित शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या झोपडी गाव-वस्तीपासुन खुपच दुर आहे.
होते आहे ते कधीही भरुन न येणारे नुकसान आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार पुढारलेपणाचे, पुरोगामीपणाचे लक्षण नाही हे समजलो.
मागील वर्षी मी तोरणा किल्ल्यावर असताना मला एका कारवीच्या पानावर एक किटक दिसला. मला वाटले की हा मृत किटक असावा. पण शंका आली की मृत असला तरी केवळ त्याच्या शरीराचे बाह्य आवरणच कसे काय बरे शिल्लक आहे, आतील बाकीचे शरीर कुठाय?
मित्र-मैत्रिणींनो सह्याद्रीवरील या फुलांचा बहर काय केवळ सौंदर्याचा आस्वाद मानवाने घ्यावा म्हणुनच नसतो बर का! सह्याद्रीची आपली स्वतःची एक परिस्थीतीकी म्हणजे इकोसिस्टीम आहे. या योजने मध्ये निसर्गातील प्रत्येक घटक आपापले कार्य अगदी न चुकता जसे करणे गरजेचे आहे तसे करीत असतो. कधी काळी मनुष्य देखील याच योजनेचा एक भाग होता.
आज प्रत्येकाला गोपाळ होता नाही येणार, २४ तास निसर्गाच्या सान्निध्यात नाही घालवता येणार. पण आपल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी देखील वसुंधरेच्या व मानवजातीच्या हितासाठी खुप महत्वाच्या व परिणामकरक सिध्द होऊ शकतात.